स्त्री भ्रूणहत्या'
स्त्री भ्रूणहत्या' ही आपल्या देशाला लागलेली फार मोठी कीड आहे. तिचा सामना कसा करायचा हे एक मोठे आव्हान सरकार, सामाजिक संस्था आणि प्रत्येक सजग नागरिकापुढे आहे. देशात स्त्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण पंजाबात सर्वात जास्त असल्याचे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाच्या (युएनपीएफ) ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुलीचा जन्म म्हणजे संकट मानण्याच्या मनोवृत्तीतून तिची गर्भातच हत्या करण्याची क्रूर पद्धत प
ंजाबमध्ये असल्याचे हा अहवाल सांगतो. शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलींची हत्या होण्याचे प्रमाण जास्त आहे. अहवालात २००१ पर्यंतची आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये १९९१ पर्यंत दर एक हजार मुलांमध्ये ७९८ मुली एवढे प्रमाण घटले आहे. पंजाबच्या शेजारी असलेल्या हरियानातील चित्रही फारसे वेगळे नाही. तेथे १९९१ मध्ये दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ८१९ मुली असे झाले आहे. मुली वाचविण्यासाठी आता मोहीम सुरू केलेल्या गुजरातमध्ये १९९१ मध्ये दर एक हजार मुलांमागे ९२८ मुली होत्या आणि २००१ मध्ये हे प्रमाण ८३३ मुलींवर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. खुद्द राजधानी नवी दिल्लीतही चित्र निराशाजनक आहे. तेथे १९९१ मध्ये दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९१५ होते ते २००१ मध्ये ८३८ मुलींवर आले आहे. स्त्रीगर्भ नको या मानसिकतेतून राजस्थानात मुलींचे प्रमाण घटत चालले असून २००१च्या जनगणनेनुसार अल्वर जिल्ह्यात प्रति एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ८८८ होती. हेच प्रमाण राज्य पातळीवर ९०९, तर देश पातळीवर ९२७ आहे. दिल्ली, पंजाब व हरयाना या राज्यांशी तुलना करता राजस्थान, महाराष्ट्न् व तमिळनाडू या राज्यांत मुलींची संख्या चांगली आहे. परंतु महाराष्ट्नच्या ग्रामीण भागात स्त्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. सरकारने गर्भ लिंगचाचणीला कायदेशीर बंदी घालूनही मानवतेचे हत्यारे असलेले अनेक वैद्यकीय व्यावसायिक आडमार्गाने लिंगचाचणीचे धंदे करीत आहेतच.
स्त्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण रोखण्यासाठी राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यात एक क्रांतिकारी उपक्रम राबविला जात आहे. न पाहिलेल्या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी वेळ स्त्री गर्भावर येऊ नये असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. स्त्री गर्भाच्या हत्येसंदर्भात जनसामान्यांमध्ये अगदी प्राथमिक स्तरावर जागृती होणे आवश्यक आहे. त्याचे गांभीर्य लोकांना कळणे आवश्यक आहे. यासाठी या जिल्ह्यात प्रत्येक विवाहात करावयाच्या सात फेऱ्यानंतर स्त्री गर्भाच्या म्हणजेच मुलीच्या रक्षणासाठी आठवा फेरा नवदांपत्याकडून घातला जातो. हा आठवा फेरा म्हणजे मुलीच्या गर्भाची जपणूक करण्याचे संबंधित दांपत्याने एकमेकांना दिलेले वचन आहे. या जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दोनशे विवाहात नवदांपत्यांंनी पारंपरिक सात फेऱ्याबरोबर आठवा फेरा करून मुलींना जगण्याची जणू हमीच दिली. सामुदायिक विवाह चळवळीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मास्य मेवान शिक्षा विकास संस्थांना या बिगर सहकारी संघटनेच्या पुढाकारामुळे स्त्रीगर्भ वाचविणारा हा क्रांतिकारी उपक्रम राबविला जात आहे. या सर्व विवाहात मुलीची हत्या न करण्याची शपथ नवदांपत्याकडून घेतली जाते.
खरंतर हा उपक्रम देशात सर्वत्र राबवणे आवश्यक आहे. प्रत्येक लग्नात सात फेऱ्यांनंतर आठवा फेरा स्त्री गर्भाच्या रक्षणाची अग्निसाक्ष हमी देणारा नवदांपत्याकडून घातला गेला पाहिजे. सर्व समाजाने यासाठी पुढाकार घेऊन याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. या कार्यात लग्न जमवणारी विवाह मंडळे, मध्यस्थ आणि लग्न लावणारे पुरोहित यांनी विशेषत: मनापासून पुढाकार घेतला पाहिजे. स्त्री गर्भाचे रक्षण ही एक राष्ट्नीय जबाबदारी असून कोणताही धर्म, जात, पंथ यांची मर्यादा न बाळगता प्रत्येक भारतीयाने आपापल्या परीने आठव्या फेऱ्याला हातभार लावला पाहिजे. सर्व महिला बंधू भगिनी नागरिक यांनी या उपक्रमाची माहिती करून घेणे आवश्यक आहे. शिवाय विविध माध्यमातून याची माहिती जास्तीत जास्त लोकांना करून देणे आवश्यक आहे. यासाठी महिला संघटना, महिला मंडळेे, भिशी मंडळे, महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांनी जागरूकता निर्माण करावी. विशेषत: महिला बचत गटांच्या मासिक बैठकीत याची माहिती द्यावी. सामुदायिक विवाह मंडळे आणि कार्यकर्ते यांनी हा क्रांतिकारी आठवा फेरा आपल्या प्रत्येक सामुदायिक विवाहात सक्तीचा करावा. जी स्त्री आपल्याला जन्म देते, आपले पालन पोषण करते, शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करते त्या स्त्री जातीच्या अस्तित्वावरच स्त्री भ्रूण हत्येमुळे संकट आले आहे. आठवा फेरा हा या समस्येवरचा अद्भुत उपाय आहे. आपणा प्रत्येकाने हा आठवा फेरा मनापासून समजून घ्यावा. ज्यांचे विवाह झाले आहेत, त्यांनी आपल्या घरातच अग्नीला साक्षी ठेवून हा आठवा फेरा करावा, यातच आपल्या देशाचे व मानव जातीचे हित आहे.
स्त्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण रोखण्यासाठी राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यात एक क्रांतिकारी उपक्रम राबविला जात आहे. न पाहिलेल्या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी वेळ स्त्री गर्भावर येऊ नये असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. स्त्री गर्भाच्या हत्येसंदर्भात जनसामान्यांमध्ये अगदी प्राथमिक स्तरावर जागृती होणे आवश्यक आहे. त्याचे गांभीर्य लोकांना कळणे आवश्यक आहे. यासाठी या जिल्ह्यात प्रत्येक विवाहात करावयाच्या सात फेऱ्यानंतर स्त्री गर्भाच्या म्हणजेच मुलीच्या रक्षणासाठी आठवा फेरा नवदांपत्याकडून घातला जातो. हा आठवा फेरा म्हणजे मुलीच्या गर्भाची जपणूक करण्याचे संबंधित दांपत्याने एकमेकांना दिलेले वचन आहे. या जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दोनशे विवाहात नवदांपत्यांंनी पारंपरिक सात फेऱ्याबरोबर आठवा फेरा करून मुलींना जगण्याची जणू हमीच दिली. सामुदायिक विवाह चळवळीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मास्य मेवान शिक्षा विकास संस्थांना या बिगर सहकारी संघटनेच्या पुढाकारामुळे स्त्रीगर्भ वाचविणारा हा क्रांतिकारी उपक्रम राबविला जात आहे. या सर्व विवाहात मुलीची हत्या न करण्याची शपथ नवदांपत्याकडून घेतली जाते.
खरंतर हा उपक्रम देशात सर्वत्र राबवणे आवश्यक आहे. प्रत्येक लग्नात सात फेऱ्यांनंतर आठवा फेरा स्त्री गर्भाच्या रक्षणाची अग्निसाक्ष हमी देणारा नवदांपत्याकडून घातला गेला पाहिजे. सर्व समाजाने यासाठी पुढाकार घेऊन याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. या कार्यात लग्न जमवणारी विवाह मंडळे, मध्यस्थ आणि लग्न लावणारे पुरोहित यांनी विशेषत: मनापासून पुढाकार घेतला पाहिजे. स्त्री गर्भाचे रक्षण ही एक राष्ट्नीय जबाबदारी असून कोणताही धर्म, जात, पंथ यांची मर्यादा न बाळगता प्रत्येक भारतीयाने आपापल्या परीने आठव्या फेऱ्याला हातभार लावला पाहिजे. सर्व महिला बंधू भगिनी नागरिक यांनी या उपक्रमाची माहिती करून घेणे आवश्यक आहे. शिवाय विविध माध्यमातून याची माहिती जास्तीत जास्त लोकांना करून देणे आवश्यक आहे. यासाठी महिला संघटना, महिला मंडळेे, भिशी मंडळे, महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांनी जागरूकता निर्माण करावी. विशेषत: महिला बचत गटांच्या मासिक बैठकीत याची माहिती द्यावी. सामुदायिक विवाह मंडळे आणि कार्यकर्ते यांनी हा क्रांतिकारी आठवा फेरा आपल्या प्रत्येक सामुदायिक विवाहात सक्तीचा करावा. जी स्त्री आपल्याला जन्म देते, आपले पालन पोषण करते, शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करते त्या स्त्री जातीच्या अस्तित्वावरच स्त्री भ्रूण हत्येमुळे संकट आले आहे. आठवा फेरा हा या समस्येवरचा अद्भुत उपाय आहे. आपणा प्रत्येकाने हा आठवा फेरा मनापासून समजून घ्यावा. ज्यांचे विवाह झाले आहेत, त्यांनी आपल्या घरातच अग्नीला साक्षी ठेवून हा आठवा फेरा करावा, यातच आपल्या देशाचे व मानव जातीचे हित आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home